नानगाव : पुढारी वृत्तसेवा - दौंड तालुक्यातील भीमानदीच्या पाणीपातळीत आजही वाढ कायम असून पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे नदीकाठचे हजारो एकर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असून ऊसपिके, जनावरांचा चारा पिके, भाजीपाला पिके व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.