पुणे; पुढारी वृत्तसेवा : समाजाचा समलैंगिक संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. मात्र, समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास समाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती 84 टक्के नागरिकांना वाटत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. केवळ 16 टक्के लोकांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हा विषय गंभीर नसल्याचे म्हटले आहे. दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे 13 भाषांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी नागरिकांची 18 ते 25, 26 ते 40, 41 ते 60 आणि 60 पेक्षा अधिक अशा चार वयोगटांमध्ये आणि पुरुष, स्त्री व अन्य या तीन लिंगांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यातून समलैंगिक विवाहांबाबतचा दृष्टिकोन बदलला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
75 टक्के लोकांना समलैंगिक विवाह ही नैसर्गिक घटना नसल्याचे वाटते. सर्व वयोगटातील आणि लिंगाच्या बहुतांश व्यक्तींनी त्यांच्या किंवा जवळच्या कुटुंबातील समलैंगिक विवाहांना पाठिंबा न देण्याची भूमिका व्यक्त केली. समलैंगिकतेचा पुरस्कार केल्यास मुलींची सुरक्षा, लैंगिकता या विषयावर माध्यमातून होणार्या माहितीच्या भडिमारामुळे कुमार वयातील मुलामुलींवर होणारे दुष्परिणाम यावर तीव्र चिंता व्यक्त केली.