पुणे; पुढरी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी परतीच्या प्रवासात मंगळवारी पहाटे 5.30 वाजता शहरात आगमन झाले.
हडपसर येथून मार्केट यार्ड परिसरात पालखी पहाटे 4 वाजता आली. तेथे पंधरा मिनिटांचा विसावा झाला. त्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात आली. तेथे माऊलीच्या पादुकांची आरती संपन्न झाली. मंगळवारी पालखी पुण्यात मुक्कामी असून बुधवारी सकाळी 10 वाजता आळंदी कडे प्रस्थान ठेवणार आहे.