बेल्हे : नगर-कल्याण महामार्गावर गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंत्यविधी उरकून महामार्गावर आलेल्या लोकांना नगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले. यामध्ये अंदाजे तीन ते चार जण जागीच ठार झाले असून आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला त्यामुळे तीन ते चार तास महामार्ग वाहतूक बंद आहे. महामार्ग लगत असणाऱ्या तीन ते चार कार गाड्या तसेच पाच सहा मोटरसायकल वाहने या ट्रकने चिरडले आहेत.