पुणे

पुणे जिल्ह्यातील 22 धरणे भरली काठोकाठ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल  22 धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याचे, शेतीसाठीच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. या पूर्ण क्षमतेने भरलेल्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात तब्बल 26 धरणे आहेत.

त्यापैकी 22 धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून उर्वरित धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही धरणे यापूर्वीच 100 टक्के भरलेली आहेत. भामा आसखेड धरणही 100 टक्के भरले असून या धरणातून शहराच्या पूर्वभागाला काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो.

पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही काठोकाठ भरले आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी डिंभे, विसापूर, वडज, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, मुळशी, गुंजवणी, निरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे आणि उजनी ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT