घोटी, सिन्नर (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात तसेच शहराबाहेर जाणाऱ्या मुंबई - आग्रा महामार्गावरील खड्क्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. सर्व्हिस रोडवरही मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्धात पाणी का पाण्यात रस्ता हे समजत नाही. त्यामुळे याठिकाणी नेहमी छोटे-मोठे अपघात होऊन वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे.
शहराबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम कासवगतीने होत आहे. उड्डाणपुलाच्या या रखडलेल्या कामामुळे सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूंनी प्रचंड मोठमोठे खड्डे पडले आहेत. येत्या पावसाळ्यात तर रेकॉर्ड ब्रेक असे मोठमोठे खड्डे झाले आहेत. खड्ड्यातील पाण्यात दुचाकीचे जवळजवळ निम्म्याच्या वर टायर बुडत असल्याने अपघात वाढत आहेत. संबंधित ठेकेदाराविषयी कोणतेही लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कारवाई करत नसल्याने नागरिक व वाहनधारकांमध्ये याबद्दल तीव्र संताप वाढला आहे. शहरात दिवसांतून चार ते पाच वेळा वाहतूक कोंडी होते, मुंबई महामार्गावर खकुघांमुळे वाहने व्यवस्थित चालवता येत नाहीत. त्यामुळे शहरात व बाहेर दोन ठिकाणी वाहनधारकांना अनेक अडचर्णीना तोंड द्यावे लागत आहे. तात्पुरत्या स्वरुपात बुजवलेल्या खड्ड्यांचा त्रास उलट मोठ्या प्रमाणात होत आहे. या खड्यांची दुरुस्ती ही सिमेंट काँक्रीटकरण करून तातडीने करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा घोटी शहरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी दिला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांच्या मुसळधार पावसामुळे सर्व्हिस रोडला तलावाचे स्वरूप आले आहे. टोलचे पैसे भरूनही मुंबई-आग्रा महामार्गावरच्या रस्त्यावरील खट्टधांतून वाहने चालवावी लागतात, यामुळे वाहनधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
मी रोज घोटी ते नाशिक प्रवास करताे. परंतु घोटी शहराबाहेर जाण्याकरता रस्त्यावरील मोठमोठे खड्डे व त्या खड्ड्यांमध्ये पाणी यामुळे वाहनाचे तसेच शारीरिकही नुकसान होते. अनेक वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे खड्डे दुरुस्त केले नाही, तर तीव्र आंदोलन करणार आहे.योगेश पवार, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक.