नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - मी असताना राज ठाकरे यांची महायुतीला गरज नाही असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राज यांची निवडणुकीत हवा गेली, त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले आहे असेही आठवले नाशिक येथे पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ही महायुती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची ताकद आहे. मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही, लोकसभेचा माणूस आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणे आवश्यक आहे.
मी असताना राज ठाकरे यांची आवश्यकता नाही, असे माझे मत आहे. राज ठाकरे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. परंतु, ते महायुतीत येणार नाहीत. ते आले तरी त्यांना घेऊ नये असे माझे मत आहे. असे रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळातही असेच वक्तव्य केले होते.