नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय हवामान विभागाने नाशिकला गुरुवारी (दि. ३०) ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, नागरिकांनी नदीपात्र, पूल, धबधबे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाने टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मौजे कोचरगाव येथील रहिवासी वाळू मुरलीधर लिलके (३५) यांचा बुधवारी (दि. २९) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. घटनेचा सविस्तर पंचनामा सुरू असून, या दुर्दैवी घटनेमुळे कोचरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.