आदिवासी रावण साम्राज्य संस्थापक विशाल जोपळे, भास्कर भोये, किरण गांगुर्डे, सुरेश गायकवाड, वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी महिलांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला.  Pudhari News Network
नाशिक

नाशिक : पाण्यासाठी महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा

वडाळा हतगड गावात भीषण पाणीटंचाई; महिलांचा पाण्यासाठी पंचायत समितरवर पायी मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

कळवण (नाशिक) : तालुक्यातील वडाळा हतगड गावातील महिलांनी गावात भीषण पाणीटंचाई होत असल्याने आज कळवण पंचायत समितीवर पायी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

सकाळीच महिलांनी एकत्र येत घोषणा देत मोर्चा सुरू केला. रिकामे हंडे घेत महिलांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आपल्या व्यथा ऐकविल्या. वारंवार तक्रारी करूनही अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.

मोर्चाच्या नेतृत्वात गावातील महिला, स्वयंसहायता गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. महिलांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करत पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा अशी मागणी केली. पंचायत समिती अधिकाऱ्यांनी समस्या लक्षात घेतली असून लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आदिवासी रावण साम्राज्य संस्थापक विशाल जोपळे, भास्कर भोये, किरण गांगुर्डे, सुरेश गायकवाड, वैभव गायकवाड आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT