इगतपुरी : नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात घडला आहे. यामध्ये १३ ते १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवार (दि.१४) घडली असून कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईट जवळ एका कंटेनरने सहा ते सात गाड्यांना भीषण धडक दिली.
नाशिकच्या कसारा घाटात एकच वेळी ५ ते ६ गाड्यांचा अपघात झाला आहे. पाऊस आणि धुक्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे जाम आहे. पावसाचा जोर असल्याने वाहतूक सुरळीत करण्यास विलंब होत आहे.
या धडकेत चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली असून आज रविवार (दि.१४) वीकेंडमुळे कसारा घाटामध्ये वाहनांची गर्दी झालेली दिसत आहे.
नाशिक मुंबई महामार्गावरील कसारा घाटात भीषण अपघात झाला असून ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने सहा ते सात वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहनांचे अतोनात नुकसान झाले. तर १३ ते १४ प्रवासी जखमी झाले. धडक दिल्यानंतर कंटेनर हा महामार्गालगत असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाला. घटनास्थळावर महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका रवाना झालेली आहे. तर रविवार (दि.१४) विकेंड असल्यामुळे कसारा घाटामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणत गर्दी असून अपघात झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.