नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) येथे शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी वीज पडून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
वैशाली विजय कवडे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पाऊस आल्याने वैशाली कवडे या घराच्या अंगणात लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे घेण्यासाठी गेल्या असता वीज कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती वावी पोलिसांना कळविण्यात आली होती.
हेही वाचा :