नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
लष्कराकडून सुरू असलेल्या प्रशिक्षणामुळे भगुर लहवित येथे घराना धक्के बसत असल्याने भुकंपाचा भास झाल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. मात्र, हा प्रकार लष्काराच्या फायरींगमुळे होत असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शुक्रवारी (दि. 24) पासून तीन दिवस रेंज एरियात फायरिग होणार असल्याने यापरिसरात कोणीही जनावरे सोडू नये तसेच व्यक्तीनी प्रवेश करून नये असे अवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे.