नंदुरबार : शहरात अनेक गोर गरीब कुटुंब गेल्या 50 ते 60 वर्षापासून अतिक्रमित जागेवर घरे बांधून रहात आहेत ती घरे नियमानुकूल करावी तसेच नगरपरिषदेने प्रलंबित राहिलेले घरकुल वाटप त्वरित करावे; मागणी बेघर संघर्ष समितीने केली आहे.
बेघर संघर्ष समिती अनेक वर्षापासून यासाठी आंदोलने करीत आहे. 1 जानेवारी रोजी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात अनेक गरीब कुटुंब अतिक्रमित घरांमध्ये राहत आहेत. त्याच जागेवर राहून मतदानाच्या हक्क बजावला, मुलांच्या शिक्षण पालन पोषण त्याच जागेवर केले. घरपट्टी, नळपट्टी घरपट्टी त्याच जागेवर राहून भरली. अशांना मालकी हक्क मिळायला हवा. म्हणून अतिक्रमण केलेल्या धारकांना सिटीसर्वे लागू करावे. तसेच 5 वर्षापासून धुळखात पडलेली 240 घरकुले लवकरात लवकर वाटप करण्यात यावे. त्याचप्रमाणे खुडाई माता टेकडी, इमाम बादशा टेकडी या ठिकाणी नवीन घरकुल बांधण्यात यावे, निवेदनात म्हटले आहे.
बेघर संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलावर शाह कादर शाह, महिला जिल्हाध्यक्ष रेहाना गणी खाटीक, रुकैय्या पठाण, शुभांगी कासार, योगिता पाटील, लता पाटील, संगीता जगताप, इस्माईल अन्सारी, सायरा अन्सारी, हसीना शेख, नसीम पिंजारी व कार्यकर्ते सह शेकडो लाभार्थी उपस्थित होते.