जळगाव : जिल्हयातील भाविक देवदर्शनासाठी गेलेले असताना शुक्रवार (दि. 23) नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत भाविकांची बस कोसळली. या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. मृतांचे शव घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व पुसद तालुक्याचे आमदार संजय सावकारे हे वायु सेनेच्या 3131 या विशेष विमानाने जळगाव एअरपोर्टवर रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास लँड होणार असल्याची माहिती अतुल झांबरे या भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील भाविक नेपाळी येथील पशुपतिनाथ दर्शनासाठी जात होते. उत्तर प्रदेश गोरखपुर येथून नेपाळमधील पोखरा येथून बस क्रमांक यूपी.५३.एफटी.७६२३ ही काठमांडूला जात होती. दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत बस पडली. बस मध्ये 43 प्रवाशी होते. यामध्ये भुसावळ तालुक्यातील वरणगाव तळवेल व इतर गावांमधील बरेच मंडळी या अपघातात मृत झालेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांनीआज दि. 24 रोजी रुग्णालयात व घटनास्थळी भेट दिली. दुपारी 25 शव घेऊन काठमांडूचे चेतन एअरपोर्ट वरून आर्मीच्या विशेष विमानाने 3131 ने जळगाव विमानतळावर रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रुग्णालयात भरती असलेल्या सोळा रुग्णांसाठी रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, परीक्षित बरहाटे, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, अतुल झांबरे हे भाजपाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. जसे जखमी बरे होतील त्यांना तसे भारतात पाठवण्यात येण्याची सोय करणार असल्याची माहिती मिळाली आहे.