जळगाव : जळगाव जिल्ह्यातील उष्ण हवामानामुळे हतनूर धरणातील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा 15 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 22 दलघमीने कमी झाला असून, यामागील एक प्रमुख कारण म्हणजे वाढलेले बाष्पीभवन.
भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे जलस्रोत असून यावर नगरपालिका, औष्णिक विद्युत केंद्र, अडनान्स फॅक्टरी, रेल्वे तसेच हजारो शेतकरी अवलंबून आहेत. मात्र, तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्यामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर बाष्परूपात हरवत आहे.
बाष्पीभवनाची आकडेवारी अशी...
5 एप्रिल: 0.33 मिमी
7 एप्रिल: 0.38 मिमी
11 व 12 एप्रिल: 0.45 मिमी
15 एप्रिल: 0.40 मिमी
यंदा एप्रिल महिन्यातील बाष्पीभवन मागील वर्षाच्या तुलनेत काही दिवस जास्त नोंदले गेले आहे. 12 एप्रिल 2025 रोजी 0.45 मिमी बाष्पीभवन झाले, तर 2024 मध्ये हीच आकडेवारी केवळ 0.14 मिमी होती.
जलपातळी: 211.520 मीटर
एकूण साठा: 258.0 दलघमी
जिवंत साठा: 125 दलघमी
टक्केवारी: 49.02 टक्के
जलपातळी: 211.950 मीटर
एकूण साठा: 280.0 दलघमी
जिवंत साठा: 147 दलघमी
टक्केवारी: 57.65 टक्के
उष्णतेच्या तीव्रतेमुळे वाढलेल्या बाष्पीभवनाचा हतनूर धरणाच्या जलसाठ्यावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.