नदीत बुडून मृत्यू File Photo
जळगाव

जळगाव : अंघोळीसाठी गेलेल्या जालन्यातील मामा-भाच्याचा तापी नदीत बुडून मृत्यू

देवाच्या कार्यक्रमासाठी जालना ते भुसावळचा प्रवास

पुढारी वृत्तसेवा

भुसावळ (जि. जळगाव) : देवाच्या कार्यक्रमासाठी भुसावळ येथे आलेल्या जालन्यातील मामा-भाच्याचा तापी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.21) सकाळी घडली. रामराजे नातेकर (वय 55) आणि त्यांचा भाचा आर्यन काळे (वय 21, दोघेही रा. जालना) अशी मृतांची नावे आहेत.

दोघेही भुसावळ शहरातील राहुल नगर परिसरातील तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रामराजे नातेकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे, तर आर्यन काळे मागे आई-वडील व भाऊ असा परिवार सोडून गेला. दोन्ही कुटुंबीयांचे हातमजुरीवर उदरनिर्वाह सुरू होता. या दुर्दैवी घटनेची नोंद भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT