कर्जाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलाने संपवले जीवन... File Photo
जळगाव

Jalgaon News| कर्जाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलाने संपवले जीवन...

पुढारी वृत्तसेवा
नरेंद्र पाटील

ताडकळस येथुन जवळच असलेल्या मजलापुर ता. पुर्णा येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने पीक कर्जाला कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या गेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री एक ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे; याबाबत योगेश काशिनाथ जाधव यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली की बदलापूर येथील आत्माराम सोनाजी जाधव वय 45 वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी पुत्र होते त्यांचे वडील सोनाजी जाधव यांच्या नावाने पाच एकर शेती असून पूर्णी येथील भारतीय स्टेट बँक परभणी येथील बडोदा बँक पिक कर्ज वडिलांनी घेतले होते.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास

जून महिना संपत असता तरी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने पेरणी कोळंबी आहे; यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे विवंचनेतून आत्माराम जाधव यांनी शनिवारी २२ जून रोजी त्यांचे चुलते एकनाथ माणिक जाधव यांच्या शेतातील गट नंबर ०६ लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद

ही घटना कळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे , संतोष चाटे, भरत तावरे, भिंगे, वडजे, आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून ताडकळस ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव कांबळे यांनी केले याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्यांच्या पश्चात पत्नी. एक मुलगा, आई वडील असा परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT