महाराष्ट्राला समृद्धी व विकासाकडे नेण्यासाठी या बहिणीच साथ देतील असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

जळगाव : महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी स्थिर सरकारची गरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : विकसित भारताच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राचे एक आगळे वेगळे स्थान आहे महाराष्ट्राचा विकसित भारतामध्ये एक महत्त्वाचा हात आहे. तर विदेशी गुंतवणूक असो, नवीन नोकऱ्या असो, नोकरीची गॅरंटी असो यासाठी स्थिर सरकार गरजेचे आहे. त्यासाठी महायुतीची गरज आहे. महाराष्ट्राला समृद्धी व विकासाकडे नेण्यासाठी या बहिणीच साथ देतील असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखपती दिदी कार्यक्रमात बोलताना केले.

लखपदी दीदी कार्यक्रमात महिलांशी संवाद साधताना त्यांनी भाषणाची सुरुवात मराठी भाषेमधून केली. तसेच नेपाळ येथे झालेल्या बस अपघातातील मृतक कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केली. जखमींवर उपचार सुरु असून त्यांना लवकरच चांगले स्वास्थ्य मिळण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली व केंद्र व राज्य सरकार त्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.

मोदींनी यावेळी महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींना कृष्ण जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती व संस्काराचे येथे दर्शन होते. मोदींनी पोलंड येथील किस्सा सांगितला. नुकताच पोलंड येथे मी गेलो होतो त्या ठिकाणी मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. संस्कृती व संस्कार याचे दर्शन हे मला त्या ठिकाणी झाले आहे. आपण कल्पना करू शकत नाही त्या ठिकाणी कोल्हापूर मेमोरियल हॉल आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या लोकांना सन्मान देण्यासाठी ते बनविण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धात राजघराण्यातील लोकांना तेथे शरण दिले जात होते. त्याची कृतज्ञता म्हणून ते बनवण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या लोकांच्या सेवाभाव ऐकतांना माझी मान उंचावत होती असे पंतप्रधानांनी सांगितले.

महाराष्ट्राचा विकास करून देशातील हे सर्वात मोठे राज्य बनवायचे आहे. आज मी राज्यातील वीर मातांच्या जमिनीवर उभा आहे. जळगाव हे वारकरी परंपरेचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी मुक्ताईची भूमी आहे. बहिणाबाईची कविता रूढी परंपरामधून बाहेर पडण्यास भाग पडते. तर शिवाजी महाराजांना दिशा देणारी जिजामाता येथे आहे. मुलींना शिक्षण घेऊन पुढे आणणारी सावित्रीबाई या जन्मभूमीत आहे. राष्ट्राला पुढे नेण्यात सर्वात मोठे योगदान दिल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

भारत विकसित होत आहे. तेव्हा पुन्हा मातृशक्ती पुढे येत आहे. मी तुमच्या मध्ये राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांची छाप बघत असल्याचे मोदींनी सांगितले. लखपती दीदींमध्ये दोन महिन्यात अकरा लाख भगिनी लखपती झाल्या आहेत. त्यामध्ये एक लाख लाखपती दिदी महाराष्ट्रातील आहे. यासाठी महायुती सरकारने खूप मेहनत घेतली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीमचे पंतप्रधानांनी कौतुक केले. महायुती सरकारने नवनवीन योजना चालवल्या आहेत. बहिणीची कमाई वाढल्यास भावी पिढी देखील सशक्त होणार असून महिला कमवायला लागली म्हणजे परिवारामध्ये मान सन्मान मिळतो आणि परिवाराचे भाग्य बदलते

70 दशक एका बाजूला ठेवून दुसऱ्या तर दहा वर्षात इतकी कामे देशातील भगिनींसाठी कोणत्या सरकारने केली नसतील असे देखील पंतप्रधानांनी नमूद केले. विकसित भारतामध्ये महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी स्थिर सरकारची गरज आहे. जो उद्योगाला प्रोत्साहन देत युवकांना नोकरी देण्यात येत आहे. महाराष्ट्र समृद्धी व विकासासाठी बळ देईल. यासाठी महायुती सरकारला माझ्या भगिनी मदत करतील व पाठीशी राहतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT