जळगाव

Jalgaon Crime : भुसावळ येथे पाच लाखांची घरफोडी

गणेश सोनवणे

जळगांव- भुसावळ शहरातील रामायण नगर मधील परिवार दिल्ली येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेला असता अज्ञाताने त्यांच्या घराचे कुलूप तोडून पाच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाला. याप्रकरणी पोलिसांच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही.

भुसावळ शहर हे रेल्वेच्या जंक्शन, ऑडनस फॅक्टरी व दिपनगरमुळे प्रसिद्ध आहे.  शहरात येण्याचे अनेक मार्ग आहेत. तसेच शहराचा दिवसेंदिवस वाढता विस्तार पाहता अनेक खेडेगाव शहरात समाविष्ट होत आहे. अशातच रामायण नगर मध्ये राहणारे सुनील अग्रवाल हे (दि. 17) रोजी वैद्यकीय तपासणीसाठी दिल्ली येथे गेले होते.  (दि. 20) रोजी त्यांच्या शेजारी राहणारे शशी कुमार यांनी त्यांना फोन करून सांगितले की तुमच्या घराचे कुलूप तोडलेले दिसत आहे. यानंतर आज बाजारपेठ येथे येऊन त्यांनी सदरील घरातील काय सामान चोरीला गेला आहे याची तक्रार दिली. यामध्ये घरातील ४० ग्रामचे रुद्राक्ष सोन्याची माळ, 35 ग्रॅम मंगळसूत्र, २० ग्रामचे मंगळसूत्र, पन्नास हजार रुपये रोख व अन्य सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून लंपास केले.

पोलीस प्रशासन रात्रीला गस्त घालत आहे. तरीही शहरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. भुसावळ हे संवेदनशील म्हणून जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलामध्ये त्याची नोंद आहे. असे असतानाही बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये चोरी करून चोर पसार झाले आहेत. यापूर्वी चोरीच्या घटना घडलेल्या असून अजूनही काही घटनांमध्ये पोलीस प्रशासनाला तपास लावण्यात अपयश  आलेले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT