जमावबंदी लागू  Pudhari News Network
जळगाव

जळगाव जिल्ह्यात 16 मेपर्यंत जमावबंदी लागू

Jalgaon News | ३ मे पासून १६ मे पर्यंत दरम्यान जमावबंदी लागू

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वातावरण चिघळू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू केली आहे.

या कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, सभा, मिरवणुका, शस्त्र बाळगणे, दाहक व स्फोटक पदार्थ ठेवणे, चित्रांचे दहन करणे, तसेच अशांतता पसरविणारे साहित्य तयार करणे किंवा प्रसारित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. ही जमावबंदी ३ मे रोजी पहाटे 1 वाजल्यापासून १६ मे रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत जिल्हा हद्दीत लागू राहणार आहे.

या कार्यक्रमासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

जिल्ह्यातील अलीकडील घटनांमुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ८ मे ते १६ मे दरम्यान विविध सण, जयंती, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने जमावबंदी आवश्यक ठरल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशातून वयोवृद्ध, अपंग व वैद्यकीय कारणास्तव लाठी अथवा सहाय्यक साधन वापरणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा व विवाह मिरवणुकांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. मात्र, अशा कार्यक्रमांसाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT