नंदुरबार : येथील कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत बिबट्याने एका कुडाच्या घरात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला. या हल्लयात तीन बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर एक बकरी बिबट्याने उचलुन नेली आहे. अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत बिबट्याने दहशत पसरवली असून वस्तीत आतापर्यंत सुमारे दहा बकऱ्या फस्त केल्या आहेत. गावात भितीचे वातावरण आहे. मृत बकऱ्यांचे पंचानामे होऊन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी व वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत एका घराबाहेर बांधलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला असून, यात तीन बकऱ्या मृत झाल्या. एक बकरी बिबट्याने उचलून नेत फस्त केली. एका महिन्यात बिबट्याने या वस्तीत सुमारे १० बकऱ्या फस्त केल्या. कुसुमवाडा व कानडी शिवारात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रविवारी (दि.२८) रोजी रात्री बिबट्याने कुसुमवाडा गावातील घराबाहेर बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला करत तीन बकऱ्या ठार केल्या. यातील एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे
कुसूमवाडा व कानडी शिवारात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबटे आता थेट गावात शिरुन पाळीव जनावरे मारु लागली आहेत.रविवारी (दि.२८) रोजी रात्री बिबट्याने कुसूमवाडा गावातील बंजारतांडा वस्तीत प्रवेश करुन मुलचंद घासी राठोड यांच्या कुडाच्या घरात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला केला. यात तीन बकऱ्या ठार झाल्या असून एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे. मुलचंद राठोड यांचे कुटूंब मजुरी करतात. जोडधंदा म्हणून त्यांनी घरात काही बकऱ्या पाळल्या होत्या. बिबट्याने या बकऱ्या ठार केल्याने त्यांचे मोठे पशुधनाचे नुकसान झाले आहे. तालुका प्रशासना मार्फत या घटनेचा पंचनामा होऊन त्यांना तत्काळ नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी होत आहे. तसेच या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी भीती वाटत आहे. गेल्या एक महिन्यात बिबट्यांनी अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत. बंजारतांडा वस्तीतच सुमारे १० बकऱ्या केवळ एकाच महिन्यात बिबट्याने फस्त केल्या आहेत. गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. भीतीचे वातावरणामुळे नागरिक संध्याकाळी बाहेर फिरणे टाळत आहेत. वन विभागाने या बिबट्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.