मिर्ची, कोथींबीर, टोमॅटो वधारले file photo
धुळे

पिंपळनेरच्या बाजारात हिरवी मिरची, कोंथिबीर गाठली शंभरी आणि टॉमेटो खातोय भाव

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यासह पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी अद्यापही भाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे भाज्यांचे दर अजूनही वाढले असून, सर्वसामान्यांच्या ताटात भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येक भाजीला चव यावी यासाठी वापरण्यात येणारी कोथिंबीर 120 रुपये किलोवर गेली आहे. काही दिवसांपासून टोमॅटोही भाव खात असून 80 रुपये किलोने विक्री होते आहे. तर हिरवी मिरची शंभर रुपये किलोने विकली जात आहे.

दोन ते तीन पावसानंतर शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन होण्यास किमान एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. परिणामी भाज्यांचे दर वधारले आहेत.

शहरात एप्रिल महिन्यानंतर भाज्यांचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ते अद्यापही कमी झालेले नाही.काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असला तरी अद्याप बाजारात भाज्यांची आवकं वाढण्यास सुरुवात.झालेली नाही. दोन ते तीन पावसानंतर शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन होण्यास किमान एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. शहरातील व्यापाऱ्यांकडे भाज्यांची आवक घटल्याने दर वाढले आहे,त्यामुळे सर्वसामान्यांच्या रोजच्या भोजनात भाज्यांचा वापर कमी झाला असून,डाळींचा वापर वाढवण्यात आला आहे. बहुतांश भाज्यांचे दर 80 रुपये किलोवर गेले आहे.काही दिवसांपासून सर्वत्र पाऊस सुरू असल्याने भाजीपाला पर जिल्ह्यात जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे एप्रिल महिन्याच्या तुलनेत किलोमागे 20 रुपये कमी झाले आहेत. ही स्थिती असली तर,सर्वसामान्यांसाठी भाज्यांचे दर अद्यापही जास्त आहे. तर कोथिंबीर 120 रुपये किलोवर गेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT