भरधाव चारचाकीने चौघांना चिरडले; महिलेचा मृत्यू Pudhari
अहिल्यानगर

भरधाव चारचाकीने चौघांना चिरडले; महिलेचा मृत्यू

या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी झाले.

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव चारचाकीने तीन ते चार जणांना चिरडले आणि ही त्यानंतर ही गाडी रस्त्यालगतच्या दुकानात शिरली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी झाले.

नागपूर-मुंबई महामार्गावर एस.जे.एस. हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. सुनंदा साबळे (वय 57, रा. संवत्सर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या अलका साबळे (वय 58) यांच्यावर जवळच्या एस. जे. एस. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोटारीचा चालक अमोल खांडगे (वय 35, रा. कोकमठाण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो मद्यधुंद होता, असा नागरिकांचा आरोप आहे.

खांडगे चारचाकी वाहन घेऊन कोपरगावच्या दिशेने येत होते. चारचाकी इतकी वेगात होती की, नियंत्रण सुटल्यानंतर ती रस्त्यालगत असलेल्या एका जनरल स्टोअर दुकानात शिरली. त्यात तीन-चार जणांना धडक बसली. दुकानदाराचेही मोठे नुकसान झाले.

हा अपघात सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाला असून, त्यात चारचाकी अत्यंत वेगाने येताना आणि अनियंत्रित होऊन दुकानात धडकतानाचे दृश्य दिसत आहे. त्या वेळी दुकानात व दुकानासमोर उभ्या असलेल्या नागरिकांची एकच पळापळ झाली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. प्राथमिक तपासात वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT