मुंबई

श्रीकृष्णाचा अपमान करणारे शिवराज पाटील यांना अटक करा

अनुराधा कोरवी

मुंबई : गीता या ग्रंथाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय माजी गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्यावर श्रीकृष्णाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांना अटक करावी, अशी मागणी अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम स्वामी यांनी केली आहे.

हिंदूंचा वारसा सांगणार्‍या लिंगायत समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे शिवराज पाटलांना गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी अखिल वीरशैव लिंगायत महासंघाने केली आहे. दिल्ली येथे मोहसीना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर यांनी कुराण व बायबल सोबत गीता या हिंदूंच्या धर्मग्रंथाची तुलना करताना श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहादची शिकवण गीतेतून दिल्याचे विधान केले.

SCROLL FOR NEXT