मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत जुलैमध्ये स्वाईन फ्लूच्या 105 रुग्णांची नोंद झालेली असताना 1 ते 21 ऑगस्ट दरम्यान 163
रुग्णांची नोंद झाली आहे, तर जानेवारी ते ऑगस्ट या काळात एकूण 272 रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरीया, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढतो. त्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी स्वच्छ, निर्जंतुकीकरण आणि पाणी साठू न देण्याचे आवाहन पालिका
प्रशासनाकडून केले जाते. मात्र तरीही यावर्षी साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत 6 रुग्ण दगावले असल्याचीही माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. त्यामधील दोन रूग्ण स्वाईन फ्लूचे, तर 4 डेंग्यू, मलेरियाचे आहेत