मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बेस्ट उपक्रमाने शुक्रवार, दि. 1 जुर्लेपासून बसमार्गामध्ये बदल केला आहे. काही बसमार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. तर, काही मार्ग प्रवासी संख्येअभावी बंद करण्यात आले आहेत.
बसमार्ग क्रमांक सी 54 वरळी आगार ते ऐरोली बसस्थानकादरम्यान धावणारी बस बीकेसी येथून छेडानगर दरम्यान कुर्ला आगार मार्गे असलेले प्रवर्तन बीकेसी आणि एव्हरार्डनगर यांना जोडणार्या मार्गावरुन धावणार आहे. सुमारे 25 मार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. याशिवाय काही मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढल्याने त्या मार्गावर बसची संख्या वाढविण्यात आली आहे.
यात सी -15 वरळी आगार ते मजास आगार,सी 40 प्र.ठाकरे उद्यान(शिवडी) बसस्थानक ते मजास आगार, सी-61 मुलुंड आगार ते आोवळेगाव,ए-220 वांद्रे बसस्थानक(पश्चिम) ते शेर्लीगाव,ए-249 अंधेरी स्थानक(पश्चिम) ते सातबंगला बसस्थानक, ए-334 मरोळ आगार ते जांभूळपाडा, ए-273 मालाड स्थानक(पश्चिम) ते मालवणी ब्लाक क्रमांक 5, ए -369 चेंबूर वसाहत ते वाशीनाका एमएमआरडीए वसाहत या मार्गावर जादा बस धावणार आहेत. तसेच काही बस मार्गाचे विलिनीकरण करण्यात आले आहे.
ए-251 सातबंगला बसस्थानक ते वेसावा-यारी रोड बसस्थानक दरम्यान धावणारी बस एसी बसमार्ग क्र-ए-249 मध्ये विलीन केली आहे. सी-11 ईलेक्ट्रिक हाऊस ते धारावी आगार दरम्यानची बस बसमार्ग क्रमांक 11 मध्ये विलीन करण्यात आली आहे. बदललेल्या मार्गाची नोंद घेउन जास्तीत जास्त प्रवाशांनी बेस्ट बसने प्रवास करावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.