मुंबई : माझा पक्ष फोडला. नेते चोरले. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा का मागता, असा खरमरीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शुक्रवारी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाठिंबा देेण्याची मागणी केली. यावेळी ठाकरे यांनी रेड्डी यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला. ठाकरे म्हणाले, बी. सुदर्शन रेड्डी यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले आहे. संविधानाचे शपथ घेऊन न्याय बुद्धीने वागणारे उपराष्ट्रपती आपल्याला हवे आहेत.