मुंबई : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच असतील. ते राज्याचे लोकप्रिय नेते आहेत असे सूचक विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून, महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागावाटपात रस्सीखेच सुरू असल्याचा प्रश्न विचारला असता, राऊत यांनी मविआमध्ये जागावाटप योग्य पद्धतीने सुरू आहे. मुंबईमध्ये २ जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची मागणी आहे. मात्र विदर्भात काँग्रेस जिंकायला हवी, तशी मुंबईत सेना जिंकली पाहिजे अशी अपेक्षा संजय राउत यांनी व्यक्त केली.