मुंबई : राज्यातील नोकरदार महिलांसाठी पाळणा योजना सुरू केली जाणार असून, त्यासाठी राज्य आणि केंद्र शासन संयुक्तपणे निधी उपलब्ध करून देणार आहेत.पहिल्या टप्प्यात 345 पाळणा केंद्रे सुरू होणार आहेत. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, नोकरदार मातांच्या मुलांना आता सुरक्षित वातावरण मिळणार आहे.
महिन्यातील 26 दिवस व रोज 7.5 तास पाळणा सुरू राहील.
एका ठिकाणी जास्तीत जास्त 25 मुलांची व्यवस्था.
प्रशिक्षित सेविका आणि मदतनीस यांची नेमणूक
नोकरदार मातांच्या 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित देखभाल व डे-केअर सुविधा
तीन वर्षांखालील मुलांसाठी पूर्व उद्दीपन तर 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी पूर्व शालेय शिक्षण
मुलांसाठी सकस आहार - सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम जेवण आणि संध्याकाळचा पौष्टिक नाश्ता (दूध/अंडी/केळी)
पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, वाढीचे नियमित निरीक्षण
वीज, पाणी, बालस्नेही शौचालय आदी सर्व मूलभूत सोयीसुविधांसह मुलांसाठी सुरक्षित वातावरण