मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणार्या आयोजकांना आता सहभागी होणार्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक होणार आहे.
सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याबाबत निर्देश दिले. येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे.