Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२८) सकाळी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी या आठ जिल्ह्यांसह सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधत मदतकार्याचा आढावा घेतला. सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणचे मदतकार्य आणि हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त जिल्हा प्रशासनाला आवश्यक सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये जेवण, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याच्या सूचनाही दिल्या. महापूराचा फटका बसलेल्या काही जिल्ह्यांत चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले. पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असा आदेशही त्यांनी दिला आहे.