Maharashtra Municipal Election Pudhari
मुंबई

Maharashtra Municipal Election: राज्यात 2,869 नगरसेवकपदांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात

मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार, पुण्यात मोठी माघार; इचलकरंजी आणि जालन्यात ऐतिहासिक मतदान होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 2,869 नगरसेवकपदांसाठी आता 15,931 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईत सर्वाधिक उमेदवार असून, नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार आहे.

राज्याची राजधानी मुंबईत 227 जागांसाठी सर्वाधिक 1,700 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ पुणे शहरात 165 जागांसाठी 1,166 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात तब्बल 968 उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने तेथे मोठी खळबळ उडाली होती. उपराजधानी नागपुरात 151 जागांसाठी 993 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

माघारीचा पुणे पॅटर्न; 8,840 जणांची माघार

पुण्यात निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला 33,427 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 24,771 अर्ज वैध ठरले, तर 8,840 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. माघार घेण्यामध्ये पुणे (968) अग्रस्थानी असून, त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर (552) आणि मुंबई (453) यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी उमेदवार (230) इचलकरंजी महापालिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT