मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून राज्यभर सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे ठिक-ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच मुंबईमध्ये तसेच उपनगरांत पावसाने चांगलेत छोडपले आहे. पुढील 24 तासांसाठी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शुक्रवारी (दि.26) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबरोबरच भारतीय हवामान खात्याने मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर ,ठाणे या जिल्ह्यात पुढील 24 तासाकरिता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उद्या शुक्रवारी (दि.26) सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.