मुंबई : बैठकीस उपस्थित मंत्री नीतेश राणे. सोबत मत्स्य आयुक्त किशोर तावडे व अधिकारी. (Pudhari File Photo)
मुंबई

Fishermen Compensation | मच्छीमारांच्या नुकसानीचा आढावा घ्या; तलावांचे सर्वेक्षण करा

मंत्रालयातील बैठकीत यांचे अधिकार्‍यांना निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबईः राज्यातील मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात पूरस्थिती निर्माण होऊन मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मत्स्योद्योग मंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकार्‍यांना सर्वेक्षण करून नुकसानीची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच राज्यातील सर्व तलावांचे सर्वेक्षण करून गाळ किती साचला आहे, याची माहिती सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

गाळ काढण्याचा कार्यक्रम पुढील काही दिवसांत राबवण्याचे प्रयत्न सुरू असून, पुढील वर्षी पुन्हा गाळ साचल्याने तलाव ओव्हरफ्लो होण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT