मुंबई : शासनाने 31 मे 2015 रोजी राज्यातील 12 टोल नाके कायमचे बंद केले तर 53 टोल नाक्यांवर कार, जीपसारख्या हलक्या वाहनांना टोलमाफी दिली आहे. तेथे केवळ मालवाहू वाहनांना टोल आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे 11 आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचा एक असे एकूण 12 टोल नाके पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. राज्यात रस्ते विकास महामंडळाचे काही टोल नाके सोडले तर मालवाहू वाहनांनाच टोल आहे, असे फडणवीस म्हणाले.