मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्यापही सावरलेला नाही. या कठीण काळात आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री स्वतः कोणताही प्रचार करणार नाहीत. अजित पवारांच्या सन्मानार्थ त्यांनी आपल्या सर्व 22 प्रचारसभा रद्द केल्या आहेत.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुकांचा प्रचार स्थानिक नेते आणि पदाधिकारी सांभाळणार आहेत.
सुनेत्रा पवार यांनी शनिवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सुनेत्रा पवारांशी सविस्तर चर्चा केली आणि कठीण काळात महायुतीचे सरकार पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.