Coconut Price Hike | नारळ कडाडले; चातुर्मासात आणखी महागणार (file photo)
मुंबई

Coconut Price Hike: मुंबईत नारळ कडाडले; एका नारळाची किंमत जाणून घ्या

Coconut Demand: तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातून नारळाची आवक

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई ः कोरोनानंतर शहाळ्यांचा खप 35 ते 40 टक्क्यांनी वाढला, दुसरीकडे नारळाची निर्यातदेखील वाढल्याने आवक घटली. परिणामी, चातुर्मास सुरू होण्यापूर्वीच एका नारळाची किंमत 35 ते 45 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

चातुर्मासात हे दर 8 ते 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. चातुर्मासात आणि सणासुदीत मध्यम आकाराचा नारळ 65 ते 72 रुपयांपर्यंत विक्री होईल, अशी भीती एपीएमसीतील घाऊक नारळ व्यापार्‍यांनी व्यक्त केली. तामिळनाडूत घाऊक व्यापार्‍यांना नारळ किलोवर खरेदी करावा लागतो. तर एपीएमसीत नगावर विक्री करतात. सध्या तामिळनाडूत 68 ते 70 रुपये किलो दराने नारळाची विक्री होते. तेच नारळ आषाढीपर्यंत 80 ते 85 रुपये किलोपर्यंत विक्री होण्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्त केली.

सध्या एपीएमसीत तामिळनाडूतून रोज 15 ते 17 गाडी नारळाची आवक सुरु आहे. 3000 ते 3500 नारळाच्या गोण्या येतात. कर्नाटकातून सध्या किरकोळ आवक सुरू असली तरी 15 जुलैपासून प्रमाण वाढेल. असे असलेतरी नारळ उत्पादनात 35 ते 30 टक्के नारळ शहाळ्यांसाठी वापरले जात असून, 20 ते 25 टक्के नारळाची परदेशात निर्यात होते. उर्वरित 40 टक्के नारळ महाराष्ट्रसह इतर राज्यात विक्रीसाठी पाठवले जातात. घाऊक व्यापार्‍यांकडून नारळाची मागणी वाढली तरी आवक घटल्याने दरवाढ सुरू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT