अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज शाही विवाह सोहळा  Pudhari File Photo
मुंबई

Anant-Radhika Wedding : अंबानी विवाहसोहळ्या निमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

जाणून घ्या नविन वाहतूक व्यवस्थेचे मार्ग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा अनंत याचे लग्न 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. लग्नासाठी जगभरातून खास पाहुणे मुंबईत दाखल होत आहेत. अनंत आणि राधिकाच्या या लग्नाबाबत वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी यांच्या भव्य लग्नाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिस विभागाने वाहतूक सल्ला जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की बीकेसी, वांद्रे पूर्व, मुंबई येथे 12 ते 15 जुलै दरम्यान एक सामाजिक कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाहुणे आणि व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वाहतूक वळवण्यात आली आहे.

या मार्गांवर प्रवेश मिळणार नाही

12 ते 15 जुलै दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरजवळून वाहतूक वळवण्यात येईल. 12 जुलै रोजी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या रहदारीत बदल करण्यात आले आहेत.

12 ते 15 जुलै दरम्यान 'या' मार्गांवर जाणे टाळा

12 जुलै रोजी दुपारी 1 ते 15 जुलै रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत वाहतूक वळवण्यात येणार आहे. लक्ष्मी टॉवर जंक्शन-धीरूभाई अंबानी स्क्वेअर एव्हेन्यू लेन 3- इंडियन ऑइल पेट्रोल पंप-डायमंड जंक्शन-हॉटेल ट्रायडेंट ते कुर्ला MTNL या मार्गावर कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT