मुंबई

मुंबईतील चौपाट्यांवर फेरफटका मारण्यास मनाई !

मोनिका क्षीरसागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मुंबई महापालिकेने समुद्र चौपाटीवर फिरण्यास सर्वसामान्यांना मनाई केली आहे. हवामान खात्याच्या ऑरेंज आणि रेडअलर्टच्या काळात समुद्रकिनारे फक्त सकाळी 6 ते 10 या वेळेतच सर्वसामान्यांसाठी खुले राहतील, असे निर्देश पालिका आयुक्तांनी विभागीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

समुद्राला भरती असताना अनेक जण चौपाटीवर फेरफटका मारण्यासाठी जातात. यातील अनेक जण जाणून-बुजून समुद्रात उतरतात. समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन चौपाट्यांवर तैनात करण्यात आलेले लाईफ गार्ड पर्यटकांना करत असतात. त्यानंतरही अनेक जण अतिउत्साह दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात

बुडण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. 14 जूनला जुहू येथे पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुले बुडाली होती. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला होता.त्यामुळेच चौपाटीवर फेरफटका मारण्यात निर्माण घालण्यात आले आहेत. या निर्बंधांची त्वरित माहिती पोलीस, अग्निशमन दल विभागाचे जीवरक्षक व समुद्रकिनार्‍याच्या देखभालीशी संबंधित कर्मचारी यांना देण्याचे निर्देशही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT