मुंबई

फडणवीसांशी अमित शहांनी केली फोनवरून चर्चा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्‍वीकारली आहे. तसेच त्‍यांनी आगामी  विधानसभा निवडणुकीच्‍या तयारीसाठी उपमुख्यमंत्री पदातून मुक्‍त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्‍ठींकडे केली आहे. आज  देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी भाजप नेते अमित शहा यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्‍यान,. फडणवीसांनी उपमुख्‍यमंत्रीपद साेडण्‍याची तयारी दर्शविल्‍याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शवली. यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी मागितली आहे. नेतृत्वाने परवानगी दिली तर पूर्णवेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार  (BJP) करता येईल, असे त्यांनी बुधवारी (दि.५ ) पत्रकार परिषदेत सांगितले हाेते.

आम्ही फक्त अर्धा टक्‍क्‍याने मागे राहिलाे

या वेळी फडणवीस म्‍हणाले हाेते की, लाेकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा एकट्या भाजपने जास्त मिळवल्या आहेत. भाजप आणि इतर पक्ष मिळून सरकार तयार होत आहे. लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 43 टक्के मते मिळाली. तर, आम्ही फक्त अर्धा टक्‍क्‍याने मागे राहिलो. यामध्ये महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मते मिळाली. तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. मुंबईमध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा मिळाल्या.

आमच्या 8 जागा केवळ 4 टक्के मतांनी पडल्या

2019 आणि 2024 च्या निवडणूकीतील मतांचे वर्गीकरण करताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपला 27.84 टक्के मते मिळाली होती. तर, यंदाच्या निवडणूकीमध्ये भाजपला 26.17 टक्के इतकी मते मिळाली. तर, 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला 16.41 17 टक्के मिळाली होती. यामध्ये त्यांच्या 13 जागा निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चुरशीने निवडणूका झाल्या यामध्ये आमच्या 8 जागा 4 टक्के मताने पडल्या.

SCROLL FOR NEXT