मुंबई इस्त्रायल-इराण यांच्यातील युध्दजन्य परिस्थितीमुळे भारताची मध्यपूर्वेहून पुढे जाणारी विमानसेवा विस्कळीत झाली. यामुळे मुंबईच्या विमानतळावर विमानांची मोठी गर्दी झाली होती. pudhari photo
मुंबई

Air India flight returns Mumbai : एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान पुन्हा मुंबईला परतले

इराणवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणचे एअरस्पेस बंद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एअर इंडियाचे मुंबईहून लंडनला जाणारे विमान अर्ध्यातून माघारी फिरवण्यात आले. यामागे कारण काय हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. फ्लाईटरडार २४ नुसार, एअर इंडियाचे विमान एएल-१२९ ने आज सकाळीच मुंबईहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले होते. मात्र पुन्हा हे विमान मुंबईत परतले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून लंडनला जाणारे विमान काही वेळातच परत मुंबई विमानतळावर परतले. यामागचे कारण इराणने इस्रायलवर केलेला हल्ला असल्याचे बोलले जाते.

इराणवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणी विमानतळ बंद करण्यात आल्यानंतर एअर इंडियाचे विमान एएल-१२९ पुन्हा मुंबईत परतले. इराणवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणचे एअरस्पेस बंद करण्यात आले आहे. या मार्गाने जाणाऱ्या सर्व विमानाचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT