धारूर : तालुक्यातील पिंपरवाडा येथील एका तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश नामदेव तिडके (वय 38) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
पेरणीचे दिवस सुरू असताना कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून सतीश तिडके यांनी आत्महत्या केल्याचे समजते. धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथील तिडके कुटुंबाला दहा एकर कोरडवाहू शेती आहे. शेती कसून हे कुटुंब आपली उपजीविका भागवत होते. दरम्यान, विविध नैसर्गिक संकटामुळे शेती न पिकल्याने सतीश तिडके यांच्यावर कर्जाचा डोंगर झाले होते. या कर्जाला कंटाळूनच तरुण शेतकरी त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.