परभणी

baby death lack of bridge | रस्ता आणि पुलाअभावी मातेचे प्राण वाचले, पण नऊ महिने पोटात वाढलेले बाळ दगावले

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : स्वातंत्र्याची ६०-७० वर्षे उलटूनही विकासाची गंगा पोहचली नसल्याचे विदारक चित्र सेलू तालुक्यातील वाई बोथ ग्रामपंचायत हद्दीत पाहायला मिळत आहे. बोथ तांडा येथील रस्ता आणि नदीवरील पुलाच्या अभावामुळे एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. परिणामी, मातेचे प्राण वाचले असले तरी, नऊ महिने पोटात वाढलेल्या निष्पाप बाळाचा जगाचा प्रकाश पाहण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बैलगाडीतून प्रवास; रस्त्याअभावी वाहनांची पाठ

गुरुवारी पहाटे ३:३० च्या सुमारास बोथ तांडा येथील श्याम विष्णू चव्हाण यांची सून कल्पना अमोल चव्हाण यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी तातडीने खाजगी वाहनांशी संपर्क साधला, मात्र गावापर्यंत रस्ताच नसल्याने चालकांनी येण्यास नकार दिला. अखेर, वेदनेने विव्हळणाऱ्या कल्पला यांना नातेवाईकांनी बैलगाडीत टाकून करपरा नदीपर्यंत नेले. नदीच्या अलीकडे वाहन उभे होते, पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता.

उपचारापूर्वीच मोठी हानी

अत्यंत बिकट अवस्थेत त्यांना राव्हा उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथील नर्स गायकवाड मॅडम यांनी तातडीने प्रसूती केली. सुदैवाने मातेचे प्राण वाचले, परंतु नऊ महिने आईच्या उदरात सुरक्षित राहिलेले बाळ व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे दगावले.

प्रशासनाचा 'बहिष्कारा'च्या इशाऱ्याकडेही कानाडोळा

"करपरा नदीवरील पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी गावकऱ्यांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवेदनाद्वारे आगामी निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आज माझ्या बाळाचा जीव गेला, उद्या आणखी कुणाचा जाईल? याला जबाबदार कोण?" — संतप्त ग्रामस्थ

पुढील पाऊल: आंदोलनाचा पवित्रा

राजकीय पुढारी आणि प्रशासनाने बोथ व बोथ तांडा येथील पुलाचे काम तात्काळ हाती न घेतल्यास, आता गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे आपण डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे पुलाअभावी बाळाचा मृत्यू होणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. "करपरा नदीवरील पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी गावकऱ्यांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवेदनाद्वारे आगामी निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आज माझ्या बाळाचा जीव गेला, उद्या आणखी कुणाचा जाईल? याला जबाबदार कोण?" असा सवाल संतप्त ग्रामस्थाने केला आहे.

तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा

राजकीय पुढारी आणि प्रशासनाने बोथ व बोथ तांडा येथील पुलाचे काम तात्काळ हाती न घेतल्यास, आता गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे आपण डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे पुलाअभावी बाळाचा मृत्यू होणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT