शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने धरणे आंदोलन करून तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला.  Pudhari Photo
परभणी

अतिवृष्टी अनुदान व पीकविमा द्या; मानवत तहसील कार्यालयात सुकाणू समितीचा ठिय्या

Parbhani News | शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मानवत, पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ नुकसान भरपाई जमा करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (दि. ६) दुपारी धरणे आंदोलन करून तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला. Parbhani News |

मानवत तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मानवतरोड येथे रास्तारोको आंदोलन केले होते. यावेळी मानवत तहसीलदारांनी एक महिन्यात नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आंदोलक शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, अतिवृष्टी होऊन महिने उलटल्या नंतर ही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. कापूस, सोयाबीन तुरीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शेतकरी सुकाणू समितीचे लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, गोविंद घांडगे, बाबासाहेब अवचार, सुरज काकडे, लक्ष्मण शिंदे, हनुमान मस्के, राम शिंदे, बालासाहेब मसलकर, दत्तराव शिंदे, ज्ञानोबा मुळे आदीसह शेतकरी सामील झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT