चारठाणा : अंघोळीसाठी चुलीवर पाणी ठेवत असताना अंगावरील साडीने अचानक पेट घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर उपचारा दरम्यान बुधवारी (दि.२६) मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि.२७) रात्री उशीरा अकास्मित मुत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, सेलू तालुक्यातील वाई येथील सरस्वती नाथराव अघाव (वय ४०) ही महिला २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी सहाच्या सुमारास चुलीवर अंघोळीसाठी पाणी ठेवत असताना तिच्या अंगावरील साडीने पेट घेतल्याने यामध्ये सदर महिलेचे दोन्ही पाय गंभीर जळाले. दरम्यान, परभणी येथे उपचार सुरू असताना दि.२६ फेब्रुवारी रोजी ती मरण पावली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात अकास्मित मुत्युची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक पूंड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि दत्ता भदर्गे हे करीत आहेत.