पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता १८.३८ कोटी नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. कारखान्याने गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्य ज्या शेतक-यांनी ऊस पुरवठा केलेला आहे. त्यांना प्रति मे. टन २२०० रुपये प्रमाणे पहिली उचल ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे.
गाळप हंगाम २०२३-२४ मध्य ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतक-यांना ऊस खरेदी करार, संमती पत्र प्रमाणे केलेले असून त्या प्रमाणे ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति मे. टन ३०० रुपये प्रमाणे आज (दि. १०) पासून शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला आहे.
हंगाम २०२३-२४ ची अंतिम एफआरपी अंदाजे प्रति मे. टन २८०० रुपये राहील. व तिसरा हप्ता करारा प्रमाणे दिपावलीच्या पूर्वी देण्यात येईल. याची ऊस उत्पादक सभासदांनी नोंद घ्यावी. हंगाम २०२४-२५ साठी सहकार्य करावे, असे अवाहन बळीराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा