Nanded News : आई, मुलीसह तिघींचा गोदापात्रात बुडून मृत्यू  File Photo
नांदेड

Nanded News : आई, मुलीसह तिघींचा गोदापात्रात बुडून मृत्यू

उमरी तालुक्यातील भायेगाव येथील घटना; मृतदेह बाहेर काढण्यासाठी लागले दोन तास

पुढारी वृत्तसेवा

Mother, daughter with three drowned in Godavari river

उमरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील भायेगाव येथील गोदा वरी नदीपात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या एक महिला व दोन मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. सात) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पडली. गावातील सार्वजनिक बोअर बंद पडल्यामुळे या लिपी धुणे धुण्यासाली गोदावरी नदीपात्रात गेल्या होल्या. गोदावरी नदीला भरपूर पाणी आल्यामुळे मृतदेह कावण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला. या दुर्दैवी घटनेने भायेगाव गावावर शोककळा पसरली आहे.

गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या उमरी तालुक्यातील भायेगाव येथील महानंदा भगवान हाणमंते (वय ३६ वर्ष), तिची मुलगी पागल भगवान हानमंते (वय १४ वर्ष) ऐश्वर्या मालू हाणमंते (वय १२ वर्ष) या तिथी शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या गोदा बरी नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या, गोदावरी नदीकाठावर चिखल, गाळ साचलेला होता. गोदावरी नदीला भरपूर पाणी आले होते. धुणे धूत असताना महानंदा हाणमंते हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली.

पाण्यात बुडत असताना तिची मुलगी पायल हिने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचाही पाण्यात तोल गेला. दोषीही खोल पाण्यात बुडत असल्याचे पाहून ऐश्वयनि आरडा-रिड करत त्या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचाही पाण्यात पाय घसरून तोल गेला. तिघीही पाण्यात बुडाल्याची माहिती जेव्हा गावकऱ्यांना समजली तेव्हा गावकऱ्यांनी गोदावरी नदीकडे धाव घेतली. घटनास्थळावर उमरीचे पोलिस पोहचले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तिघींना शोध घेण्याचा अथक प्रयत्न केला. परंतु पाणी जास्त असल्याने लवकर शोध लागला नाही.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी एक बोट आणून लांब बांबू टाकून शोध घेतला. लोखंडी गळ टाकून पाण्यात फिरवले असता दोन तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या तिघींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह एका बोटीत टाकून गोदाकाठावर आणण्यात आले. तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या तिघांचे मृतदेह बाहेर काढून उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या ठिकाणी डॉ. सुरज साबळे यांनी शवविच्छेदन केले, अशी माहिती भायेगाव येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील भायेगावकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. सर्व मृतदेहांवर सायंकाळी ७ वाजता भायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बोअर दुरुस्त केला असता तर...

यंदा कडक उन्हाळा पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण शारली होती. त्यातच भायेगाव येथील मागासवर्गीय वस्तीतील कळाल्यामुळे अनेक दिवसांपासून बोअर नादुरुस्त होती. बोअर नादुरुस्त असल्याने नागरिक पाण्यासाठी हैराण होते. गोदावरी नदीला भरपूर पाणी आले होते. गामुळे नदीपात्राकडे सहस्रा कुण्णी जात नसे. नाईलाजाने या भागातील महिलांना धुणे धुण्यासाठी गोदावरी नदीवर जावे लागत होते. यातूनच ही दुर्दैवी घटना घडली. जर गावातील बोअर वेळीच दुरुस्त केला असता तर ही वेळ आलीच नसती, असे सामाजिक कार्यकर्ते सुमेध कदम यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT