Chilli farming flourished even in summer; Ideal plot of the biradar of Nadiwadi
ज्ञानेश्वर भंडारे
वलांडी : नदीवाडी येथील शेतकरी रामदास शिवाजी बिरादार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मिरची शेतीचा सुंदर आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असते. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी शेती करण्यास टाळाटाळ करतात. मात्र रामदास बिरादार यांनी या आव्हानाला संधी मानत आपल्या शेतात मिरचीची लागवड करून उत्कृष्ट प्लॉट तयार केला आहे.
मर्यादित पाण्याच्या उपलब्धतेतही योग्य नियोजन, वेळेवर मशागत आणि पिकाची निगा राखत त्यांनी मिरचीचे पीक जोपासले. परिणामी त्यांच्या शेतातील मिरचीचा प्लॉट हिरवागार व दाट दिसून येत असून परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
रामदास बिरादार यांच्या मेहनतीमुळे आज त्यांचा मिरचीचा प्लॉट परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक शेतकरी त्यांचा प्लॉट पाहण्यासाठी येत असून त्यांच्या शेती पद्धतीची माहिती घेत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून चांगले उत्पादन घेता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रामदास बिरादार होत. नदीवाडी गावातील या कष्टाळू शेतकऱ्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर आदर्श निर्माण केला असून परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात असून रामदास शिवाजी बिरादार हे नदीवाडी गावचे आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण करत आहेत.