समृद्धी महामार्गावर अपघातातील कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढल्या.  file photo
जालना

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार

दोन कारची धडक; जालना जिल्ह्यातील घटना

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. दोन कारच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या इर्टिका कारला चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारमध्ये बसलेले प्रवासी रस्त्याच्या कडेला पडले. घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने दोन्ही गाड्या बाहेर काढल्या. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT