पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.२५) दुपारी ४.२० मिनिटांनी आपले आमरण उपोषण पाणी घेऊन मागे घेतले. सकाळी त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली होती. मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण उपचार घेऊन उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडावे का? असा प्रश्न जरांगे यांनी मराठा समाजाला विचारला होता. यावर समाजाने त्यांना सकारात्मकता दाखवली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने मांडली. त्यानंतर उपोषण मागे घेण्याबाबात उपस्थित मराठा बांधवांना विचारले. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय जरागेंनी घेतला. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे, असे जरांगे म्हणाले.